Babasaheb Ambedkar Quotes In Marathi | 100+डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

Babasaheb Ambedkar Quotes In Marathi : आजपर्यंतच्या भारतीय इतिहासामध्ये सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच ओळखलं जातं. अशा या महान विचारवंत असलेल्या बाबासाहेबांनी अनेक विषयांवर आपले विचार मांडलेत आणि त्यातीलच काही मराठी विचार मी इथे संकलित केलेत. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi आपण ऐकले आणि हे सुविचार जर आपण समजून घेऊन ते आचरणात आणले तर आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला एक दिशा मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार…

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये,
लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

जीवनाच्या प्रवासात आपण त्याचवेळी,
सक्षमपणे उभे राहू शकतो,
ज्यावेळेस आपण स्वतःच्या समस्येवर,
स्वतःच तोडगा काढतो.

संकटावर अशाप्रकारे तुटून पडायचं,
जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास.

जो मनुष्य मरायला तयार होतो,
तो कधीच मरत नाही,
आणि जो मरायला भीतो,

आधीच मेलेला असतो.

हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु,
गुलामीही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

काम लवकर करायचं असेल तर,
मुहूर्त पाहण्यात वेळ वाया घालवू नका.

अधिक वाचा : जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंग

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय आणि विविध विषयांवर मांडलेले विचार वाचण्यासाठी इथे क्लिक करा. ⬇

Dr.Babasaheb Ambedkar

तुम्ही दुसऱ्यांकडून काय घेता यापेक्षा दुसऱ्याला,
काय देता यावर तुमचा आनंद अवलंबून असतो.

भाकरी पेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे.

नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा,
स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा,
आपण जे करतोय किंवा आपल्यात जी ताकद आहे,
ती ओळखायला शिका नशिबावर निर्भय राहू नका.

दसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास,
शिकणे हेच खरं शिक्षण आहे.

शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो,
पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

आकाशातील ग्रह तारे जर,
आपलं भविष्य ठरवत असतील,
तर आपलं मनगट आणि

मेंदू याचा उपयोग नसतो.

बुद्धीचा विकास करणे हेच,
मानवाच नेहमी ध्येय असलं पाहिजे.

स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा,
स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा.

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा,
रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.

अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार,
सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो.

जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो,
तो नेहमी चांगले कार्य करत राहतो.

सर्वात आधी आणि सर्वात शेवटी,
आपण एक भारतीय आहोत.

जो मनुष्य मरायला तयार होतो,
तो कधीच मरत नाही,
आणि जो मरायला भितो तो

आधीच मेलेला असतो.

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे,
तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका.

स्वातंत्र्य विचारसरणीचे स्वातंत्र्य,
वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा.

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही,
आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती.

शीला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

लोकात तेज आणि जागृती
उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

देवावर भरवसा ठेवू नका जे करायचे,
ते मनगटाच्या जोरावर करा.

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा,
भयंकर आणि भीषण आहे.

चारित्र्य शोभते संयमाने आणि सौंदर्य शोभते शिलाने.

उगवत्या सूर्याला नमस्कार करताना,
मावळत्या चंद्राला विसरू नका.

करुणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला कसाई समजा.

इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधा.

माणसांच्या सहवासापेक्षा,
पुस्तकांचा सहवास अधिक चांगला असतो.

तिरस्कार माणसाचा नाश करतो.

माणसानं जन्मभर जरी शिकायचं मनात आणलं तरी,
विद्यासागरच्या कडेला गुडघाभर ज्ञानात जाता येईल.

बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात पण,
अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.

तुम्ही किती अंतर चालत गेला त्यापेक्षा,
तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात,
ते अधिक महत्त्वाचे आहे.

मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता,
समानता आणि बंधुता शिकवतो.

जे इतिहास विसरतात ते,
इतिहास घडवू शकत नाहीत.

भारतात सर्वाधिक द्वेष केला जाणारा माणूस,
मी आहे तो माझ्या सत्य बोलण्यामुळे.

शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत,
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.

साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा,
मग बघा काय चमत्कार घडतो ते.

एक वेळ शिक्षणाशिवाय जगणं शक्य आहे,
पण स्वाभिमान शिवाय नाही.

स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजेच,
खऱ्या अर्थाने आत्मसन्मान असतो.

माणसाने मरण पत्करावा,
पण अन्यायाने झुकू नये.

संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नसून,
ते सामाजिक न्यायचं शस्त्र आहे.

जिथे बुद्धी आहे तिथे भीती राहत नाही.

हक्क मागून मिळत नसतो तर,
त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.

जी व्यक्ती स्वतःचा मान राखत नाही,
तिचा कोणीही मान ठेवत नाही,

जर आपण एकजूट राहिलो नाही तर,
आपल्यावर पुन्हा गुलामगिरी लादली जाईल.

जो माणूस मरेपर्यंत शिकत नाही, तो मेलेला असतो.

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील,
तर एक रुपयाची भाकरी घ्या,
आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण,
भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि
पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल.

Treading

More Posts