Mahatma Gandhi Quotes | 100+ महात्मा गांधी सुविचार मराठीमध्ये
Mahatma Gandhi Quotes
Mahatma Gandhi Quotes : महात्मा गांधी एक महान स्वतंत्र्य सैनिक होते. त्यांना आपण सर्व “राष्ट्रपिता” या नावाने ओळखतो. तसेच महात्मा गांधी यांना “बापू” या नावानेही ओळखले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले. सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्त्वज्ञान संपूर्ण जगाला शिकवले. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रेरणादायी विचार सांगितले आहेत. चला तर मग ते आपण पाहूया…

चांगल्या बदलाची सुरुवात,
आधी स्वतःपासून करा.
ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा,
सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा.
आधी ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत,
नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही
पण त्यानंतर तुम्ही जिंकणार.
तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचं असू शकतं,
पण तुम्ही काहीतरी काम करणं,
हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं.
असं जगा की उद्या तुम्ही मरणार आहात,
आणि असं शिका की तुम्हाला
कायम जिवंत राहायचं आहे.
अधिक वाचा: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुविचार मराठीमध्ये
महात्मा गांधी यांची संपूर्ण माहिती वाचाण्यासाठी इथे Biography क्लिक करा.
तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता,
पण माझ्या मनाला कैद करू शकत नाही.
सहानुभूती गोड शब्द ममतेची दृष्टी,
यांनी जे काम होते ते पैशाने कधीच होत नाही.
तुम्ही नम्रपणाने ही जगाला हादरवू शकता.
राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे,
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.
सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे,
सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा
ही त्या देवाची आराधना आहे.
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा,
तुमचा “स्व” तुम्हाला सापडेल.
तुम्ही काय विचार करता, तुम्ही काय बोलता,
आणि तुम्ही काय करता यात एक वाक्यता
असेल तेव्हाच आनंद मिळेल.
माणूस आपल्या विचारांशिवाय काहीच नाही,
तो जसा विचार करतो तसेच तो बनत असतो.
एखाद्या देशाची संस्कृती तेथील रहिवाशांच्या,
हृदयात आणि आत्म्यात वसलेली असते.
आनंद तेव्हाच मिळतो ज्यावेळी
तुम्ही जो विचार करता,
जे बोलता आणि जे कृतीत आणता
ते सामंजसाने केलेले हवे.
जग बदलायचं असेल तर,
आधी स्वतःमध्ये बदल घडवा.
ज्या व्यक्तीमध्ये विचार करण्याची क्षमता असते,
त्या व्यक्तीला शिक्षकाची ही गरज नसते.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
मित्राची मैत्री करणे सोपे आहे, पण तुम्ही ज्याला
शत्रू समजता त्याच्याशी मैत्री करणे,
म्हणजे खऱ्या धर्माचे सार आहे.
सत्याच्या दिशेने जा, आपल्याला अशी शक्ती देतील की,
तुम्ही सर्वात महत्त्वाच्या वस्तू निर्माण करू शकता.
अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.
स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही जर त्यात,
चुका करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नसेल.
आयुष्याचा प्रत्येक दिवस हा
शेवटचा म्हणून जगा,
आणि असं शिका की,
तुम्ही अमर राहणार आहे.
फक्त आनंद एकमेव अत्तर आहे
जे तुम्ही इतरांवर शिंपडता,
तर त्याचे काही थेंब तुमच्यावरही पडतात.
सत्य तुमच्या जीवनाचा माणिक आणि
आपल्या व्यक्तिगतीकरणाचा दर्जा असतो.
अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे,
ती मनुष्याने तयार केलेल्या विनाशातील शक्तिशाली
शस्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.
राग आणि असहिष्णुता हे,
समजूतदारपणाचे शत्रू आहेत.
आपण एखादे काम हाती घेतले तर,
आपले अंतकरण त्यात ओतावे व
त्याचे फळ ईश्वरावर सोपवावी.
मनाला उचित विचारांची सवय लागली,
की उचित कृती आपोआप घडते.
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे,
तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही
पण तुम्ही काहीच केले नाही तर त्यातून
काही निष्पन्न ही होणार नाही.
कानांच्या गैरवापरामुळे मन प्रदूषित होते
आणि मन अस्वस्थ होते.
अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे,
जगातील इतर कोणत्याही हत्यारापेक्षा
हे अधिक बलवान आहे.
तुम्ही जर तुमचा स्वाभिमान कुणाला दिलाच नाही,
तर कुणी तो हिरावून घेऊ शकणार नाही.
तुमचा आनंद तुम्ही केलेल्या विचार,
वकृत्व आणि संवाद यावर अवलंबून आहे.

देवाला कोणता ही धर्म नसतो.
माणसातील चांगले गुण पाहून,
त्याला मदतीचा हात द्या.
तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते,
विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेला आहे.
शांतता टिकवण्याचे सामर्थ्य नसेल तर,
तो नेता होऊ शकणार नाही.
अहिंसा हा माझ्या श्रद्धेचा पहिला लेख आहे,
आणि माझ्या पंथाचा शेवटचा लेख ही आहे.
मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो.
भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे,
की आज तुम्ही काय करताय.
जगातील काही माणसे वाईट असतात,
म्हणून माणुसकीचा महासागर दूषित होत नाही,
काही वाईट व्यक्तींमुळे माणुसकी वरचा विश्वास गमावू नका.